Sunday, November 2, 2008

दिवाळी काय देते...

दिवाळी आली आणि गेली.. दिवाळीच्या निमित्तानं आमच्या जगण्यात उगाचच काही दिवे आले , काही लागले.. पण हा आनंद एकत्रित साजरा करु शकलो का.. हा महत्वाचा प्रश्न आहे..
दिवाळी काय असते आपल्या सगळ्यांसाठी, तर या निमित्तानं आपण एकत्र येतो, नाहीतर आपल्या राहटगाड्यात आपल्याला तरी कुठे एकत्र येण्याचे निवांत क्षण मिळतात, नाही का.. कधीतरी एखाद्याचा वीक एंड खूप चांगला साजरा होता खरा.. पण तो त्या एकट्याशी संबंधित राहतो. मात्र दिवाळीचा उत्साह सगळ्यांना असोत. या निमित्तानं घराघरात गोडधोड होतं. नव्या वस्तू येतात. गेल्या वर्षी ठरवलेल्या काही उद्दिष्टांची पूर्ती होते. प्रत्येकाची ध्येय वेगवेगळी असतात खरी, पण ती पूर्ण करण्यासाठी दिवाळीचे टार्गेटस असतात, ते महत्वाचं.. प्रत्येकाच्या ध्येयपूर्तीच्या मर्यादा या वेगवेगळ्या असू शकतात. उदा. काही जणांसाठी टीव्ही असेल, तर एखाद्यासाठी कार, तर एखाद्यासाठी कपडेही..
दिवाळी निमित्तानं आपण अनेकांना शुभेच्छा देतो. एसएमएससारख्या माध्यमातून त्यातले 80 टक्के खोटे, नाटकी असतील किंवा अपरिहार्यतेतून आलेले असतीलही, पण किमान 20 टक्के आपल्या अवतीभोवती असणा-या चांगल्या माणसांनी आठवण आपल्याला या निमित्ताने होते.. त्यांच्याशी गप्पा होतात. सर्वात महत्वाचं दोन दिवस माणसं निवांत असतात... नवरा बायकोला वेळ देतो, बहिण भावाला वेळ देते.. किती महत्वाचं आहे की नाही.. हे सगळं.. नाहीतर धावताना आपण आता सगळचं विसरायला लागलो आहेत.. यात हे काही विरुंगळ्याचे क्षण वर्षभर पुन्हा धवण्याची आणि नव्या ध्येय निश्चितीची एक उमेद देतात. माणसांमाणसांमध्ये संबंध विरळ होत असताना, दिवाळीसारखे सण खरचं काही तरी दिवे घएऊन येतात. मला वाटतं नेहमीच्या जगण्याच्या धावपळीत हे असं काहीतरी असायला हवं बरं नाहीतर आपण कामापाठी वेडे होऊन जाऊ... म्हणूनच जागतिक मंदीच्या वाटेवरही खरेदी कमी झाली असली तरी दिवाळीची उत्साह मात्र आपल्या सगळ्यांच्या मनात तेवढाच राहीला हे महत्वाचं.. थोडे फटाके कमी वाजले असतील, थोडे ग्राहक कमी झाले असले तरी दिवाळी दिवाळीच राहीली..

No comments: