Saturday, April 26, 2008

एक अनुभव..

रात्रपाळीसाठी घरातनं निघालो.. घरी कुणीही नव्हतो.. जेवायला एका हॉटेलात गेलो..
स्वाभाविक रात्री 9ची वेळ असल्यानं हॉटेलात गर्दी होती.. कुठे बसायचं.. हे ठरवत असताना
एका टेबलावर एक अंधळा मुलगा जेवताना दिसला..
त्याचे कपडे फाटके होते.. थोडेसे मळलेलेही होते..
एवढ्या चांगल्या हॉटेलात तो एकटाच न शोभणारा असा दिसत होता..
त्याच्या शेजारच्याच टेबलावर जेवायला बसलो.. माझ्या आजूबाजूच्या चार टेबलांवरील
माणसांचं लक्ष त्या अंधळ्या माणसाकडं होतं. त्याच्या पुढ्यात भात होता,
त्यात ओतलेलं वरण त्याला दिसत नव्हतं. त्याला पाणी देणारा पो-या त्याला
तो भात कालव असा आग्रह करीत होता. पण त्या बिचा-याला त्याची कल्पनाही नव्हती..
माझ्या समोरच्या टेबलावर बसलेला एक माणूस जेवताना त्या अंधळ्याकडं बघत होता.
वेटरला बोलवून आपल्या ताटातलं दही आणि स्वीट त्यानं त्या अंधळ्याला द्यायला लावलं.
माझंही जेवण आटोपत आलं होतं. तेवढ्यात त्या अंधळ्या माणसांचही जेवण संपलं. तो उठला..
काउंटरला गेला , तर आलेलं बील भरायला त्याच्या खिशात पैसेच नव्हते. त्यानं त्याचे सगळे खिसे तपासले. मात्र त्याच्या खिशात पैसेच नव्हते.. हॉटेलमालकानं एका शब्दानंही न हटकता त्याला जाउ दिलं. मी बील द्यालया काउंटरवर गेल्यावर शंभराची नोट दिली.. आणि त्या अंधळ्या मुलाचे पैसेही माझ्या बीलाबरोबर घ्या असा आग्रह केला. मात्र हॉटेलमालकानं मला नकार दिला. असे रोजच येतात हेही त्यानं मला सांगीतलं.. त्याच्यासोबत आलेल्या माणसानं त्या अंधळ्याला हॉटेलात सोडताना त्याच्या खिशातील 20 रुपयांची नोट पळवल्याचंही त्यानं सांगीतलं. तो पैसे पळविणारा एका बाजूला, तर त्याला भात कालवण्याचा आग्रह धरणारा पो-या, दही देणारा ग्राहक, बील न घेणारा हॉटेलमालक आणि त्याचं बील भरणारा मी, असे दुस-या बाजूला होतो. आम्ही कुणीच कुणाला ओळखत नव्हतो.. यापुढे भेटण्याची शक्यताही नव्हती.. पण हॉटेलमालकाच्या या सांगण्याने माझे डोळे भरुन आले.. जगात चांगुलपणा नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना
कोणीही बडेजाव न मिरवता सहज त्या अंधळ्याला पोटभर मिळावं
यासाठी प्रयत्न करीत होतो.. यात दयाही नव्हती.. एक माणूस म्हणून दुस-या माणसाबद्दल वाटणारा जिव्हाळा होता..
एरवी त्या हॉटेलमालकाच्या गब्बरपणामुळे
त्याच्याबद्दल वाटणारा एक आतला संताप क्षणात नष्ट झाला. त्याला आशिर्वाद द्यावेसे वाटले
ते दिलेही.. पण मनातल्या मनात.. मी काहीही केलं नव्हतं.. मी पैसेही दिले नव्हते..पण आत कुठेतरी खूप समाधानानं मी स्टेशनवर गाडी पकडायला आलो.. आत कुठेतरी आपण सुरक्षित आहोत.. इथे चांगुलपणा आहे.. असं उगाचच आत कुठेतरी वाटलं.. आणि तो दिवस आनंदात गेला..

3 comments:

wanderer said...

hey i liked ur thoughts... will write latter abt it :D

wanderer's world said...

life shows us many shades... generally we tend to remember negative experiences... probably the incident which u saw was a blissful for u... i feel that was because of firm belief in positivity of life... it is quite an important thing to keep ur eye open then only we will get to see such things... ofcourse for that we need to be sensitive enough as well... life is good n so good things happen... hey lots of philosophy, isnt it????

AMAR HABIB, किसानपुत्र आंदोलन said...

Chaan Lihiles. Ek sadha anubhav. Tuzya Jivhari Lagla tasaach konaahi vachakala laagel ashaa Bhaashet tu ubha kelay. Likhte raho. Ek Anubhav.. Dusra anubhav... Tisra... ashi Maalikaa kartaa yeil.