Thursday, February 10, 2011

असंच काहीसं आठवलेलं...

जालन्यात शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाचा प्रसंग-
नांदेडात रिपोर्टिंग गेल्यावर काही दिवसांतच
जालन्यात शेतकरी संघटनेचं अधिवेशन कव्हर
करण्याचे आदेश मिळाले.. नियमाप्रमाणे तिथे
गेल्यावर लक्षात आलं, ते हे की एका चांगल्या
हॉटेलात पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था केलेली.
अधिवेशनात म्हणजे शरद जोशी यांचे प्रवचन
ऐकण्यासाठी आलेला शेतकरी वर्ग....संध्याकाळी
बातम्या फाईल करुन परतण्याच्या विचारात असताना
पाहिलं तर स्टेडियममध्ये शेतकरी त्या थंडीतच
चुली पेटवून बसलेले..तिथेच स्वयंपाक, जेवण आणि
पुन्हा पुढचं दोन दिवसांचं अधिवेशन.. तशी फारशी
थंडी किंवा पाऊस नसला तरी मुक्काम मंडपात आणि
अधिवेशन स्थानीच.. स्वत:च्या पत्रकार असण्याची
आणि हॉटेलातल्या सोयींची लाज वाटली...
अमर हबीब हे या ठिकाणी भेटलेले मोठ्ठे कार्यकर्ते..
अत्यंत साध्या वेशातल्या या माणसानं पहिल्याच दिवशी मन
जिंकून घेतलेलं... तगमग होत असताना त्यांच्याकडे
गेलो आणि त्यांना सांगीतलं की हॉटेलात राहणं
अवघड आहे म्हणून, बॅग उचलली आणि आमच्या
जालन्यातल्या रिपोर्टरच्या घरी कॅमेरामनसह
रहायला गेलो... मनातून तेवढीच शांतता, किमान
आपण आपल्या पदाचा गैरवापर तर केलेला नाही..

नवीन पर्व के लीए...

नव्या वळणावर नवे संकल्प आणि
स्वत:लाच अधिक संघटीत करण्याचा प्रयत्न..
पाहुयात पुन्हा बुडी मारुन हाताला काय लागते का ते ?
कशा स्वरुपात त्याची जाहीर मांडणी चुकीची ठरेल..
आता तिशी ओलांडल्यावर गेल्या 10 कमावत्या
वर्षांचा हिशेब आणि नव्या आव्हानांना सामोरं
जाण्याची मानसिक तयारी.. ही 10 वर्ष
कष्टाची होती, पुढची स्थिरावल्यामुळे
कदाचित कमी कष्टाची असावीत...
मग आपल्या मुळच्या पिंडाकडे जाण्याचा
आता पुन्हा प्रयत्न करता येईल का...
वेळ अधिक सक्षमपणे वापरण्याचा प्रयत्न..
वगैरे वगैर...